Tuesday, July 20, 2010

वार्‍या वार्‍या ये ये

हि माझी कविता नाही,मुलीने सुचवलेली आहे.

काल शाळेतून तिला घेऊन घरी येताना फारच गरम होत होत. तिला चालवत नव्हत म्हणून जरा गम्मत करावी अस वाटून तिच्याबरोबर म्हणून चिमणी चिमणी वारा घाल , कावळ्या कावळ्या पाणी दे अस गाण म्हणत होते. मग त्यात जरा बदल करून नुसतच "वार्‍या वार्‍या ये ये " अस म्हणायला लागले.
तर तिने त्यात अजून एक वाक्य स्वत:च जोडलं. "आमचा घाम सुकव रे"!
मग आमची दोन वाक्याची कविताकच झाली.

"वार्‍या वार्‍या ये ये
आमचा घाम सुकव रे"

त्याला जरा आणखी रूप देण्यासाठी मी काही वाक्य टाकली आणि आम्ही दोघी रस्त्यातून उन्हात चालताना हि कविता म्हणायला लागलो. उन जरा सुसह्य झालं.

ढगा ढगा ये य्रे
सुर्योबाला लपव रे
ढगा ढगा ऐक रे
थोडी सावली कर रे

वार्‍या वार्‍या ये ये
आमचा घाम सुकव रे
वार्‍या वार्‍या ऐक रे
आमची गरमी घालव रे


चिमणी चिमणी वारा घाल , कावळ्या कावळ्या पाणी दे च्या चालीवर म्हणून बघा बर तुमची गरमी सुसह्य होतेय का ते.

0 comments: